राजकीय
कुसुम सौर योजनेतील गोंधळावर विधानसभेत संतोष दानवे आक्रमक ; शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण?

मुंबई संग्रामभूमी न्यूज नेटवर्क :
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधत भोकरदन मतदार संघाचे भाजपा आमदार संतोष दानवे यांनी कुसुम सौर ऊर्जा योजनेतील अडचणींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपन्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी आमदार संतोष दानवे यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी आमदार संतोष दानवे म्हणाले की, राज्यात कुसुम सौर ऊर्जा योजनेअंतर्गत सुमारे ८.५ लाख सौर पंप बसवण्यात आले असून, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, CRI सारख्या कंपन्यांच्या निष्काळजीपणा आणि मनमानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना ४ ते ५ महिने पंप दुरुस्ती व सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.